मुख्य सामग्रीवर वगळा

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

 

सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत.

नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी ई-श्रम कार्ड (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते.

आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी
ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावे.


ई-श्रम कार्डसाठी नोंदणी कशी करावी?
या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड म्हणजेच आधार क्रमांक आवश्यक आहे. याशिवाय आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर, बचत बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड आवश्यक आहे. ज्या माध्यमाद्वारे सरकार तुमच्या खात्यात थेट आर्थिक लाभ देते. जर कोणत्याही कामगाराकडे त्याचा/तिचा आधार लिंक मोबाईल नंबर नसेल, तर तो/ती त्याच्या जवळच्या CSC/SSK च्या बायोमेट्रिक पडताळणीद्वारे नोंदणी करू शकतो. ई-श्रमिक कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही ऑनलाइन अर्जही (Online Registration) करू शकता. यासाठी तुम्हाला श्रमिक पोर्टलच्या eshram.gov.in या वेबसाइटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.


ई-श्रम कार्डचे काय आहेत फायदे?

  • दर महिन्याला आर्थिक लाभ थेट कार्डधारकाच्या बँक खात्यात पोहोचतो.
  • रु. 2 लाख विमा संरक्षणासह घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते.
  • यासोबतच कामगार मंत्रालयाच्या इतर योजनांचा लाभही मिळतो.
  • कामगाराला सरकारकडून 2 लाख रुपयांची विमा सुविधा मिळते.
  • एखाद्या अर्जदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा लाभ मिळतो. त्याचबरोबर ई-श्रम कार्डधारकाचे अपघातात अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.

टिप्पण्या

Popular Posts

Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा.

  Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा. March 25, 2023   by  Update 24 taas Free Electricity : हवामानामुळे या महिन्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे घरात जास्त वीज वापरली जात आहे. वीजेचा वापर जास्त असल्याने दरमहा हजारो रुपयांची वीजबिल भरावी लागते. दुसरीकडे उन्हाळ्यात लोडशेडिंगमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. येथे क्लिक करा  मोफत वीजेचा आनंद घेण्यासाठी येथे क्लिक करा    त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विलक्षण कल्पनाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात तुमच्या घराची वीज मोफत वापरू शकता आणि वीज विकूनही भरपूर कमाई करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.   येथे क्लिक करा  शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता एकाच अर्जावर मिळणार ट्रॅक्टर, शेततळे, विहिर, पॉलीहाऊस; असा करा अर्ज   या लेखात आम्ही तुम्हाला सोलर पॅनलपासून वीज निर्माण करण्याच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत परंतु या संपूर्ण प्रक्रियेत वापरलेले सोलर पॅनल्स आक...

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...