मुख्य सामग्रीवर वगळा

दिलासादायक! शेतकऱ्यांना होणार 5 लाख सौर पंपांचं वाटप; नेमक्या तरतूदी काय? | PM Kusum Yojana

 

महाराष्ट्र सरकार कुसुम योजनेंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ही घोषणा केली होती.


शेतीमध्ये सिंचन ही गंभीर समस्या बनली आहे. मात्र, याला सामोरं जाण्यासाठी सरकारनं अनेक योजनाही अंमलात आणल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, पंतप्रधान कुसुम योजना (PM Kusum Yojana). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर पंप (Solar Pump) दिले जातात. या योजनेचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर होऊ शकते. यासोबतच शेतकऱ्यांना योग्य वेळी सिंचन मिळाल्यास त्यांच्या उत्पादनातही वाढ होईल. यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढण्यासही मदत होईल .


शेतकऱ्यांना 5 लाखांत सौर पंप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र सरकार पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौर पंपांचं वाटप करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यासंदर्भात घोषणा केली होती. ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत पाच लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची योजना आखत आहे. यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सर्वाधिक बसतो.  

किती मिळणार अनुदान? 

पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सौरपंपांवर 30 टक्के, राज्य सरकारकडून 30 टक्के आणि इतर वित्तीय संस्थांकडून 30 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च स्वतः भरावा लागणार आहे.

'या' योजनेसाठी पात्रतेचे निकष काय? 

  • पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरतील 
  • शेततळं, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले यांच्या शेजारील पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरीच यासाठी अर्ज करू शकतील. 
  • अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरीच यासाठी अर्ज करू शकतात. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?

  • सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक
  • सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक फोटो
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अधिक माहितीसाठी काय कराल? 

अलिकडेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारनंही शेतकऱ्यांकडून अनुदानावर सौरपंपांसाठी अर्ज मागवले होते. सोलर प्लांट बसवून शेतकरी 15 लाख रुपयांपर्यंत वीज निर्माण करू शकतात. ऊर्जा विभाग 3 रुपये 7 पैसे दरानं उत्पादित वीज खरेदी करेल. यानुसार शेतकऱ्यांना वार्षिक 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं. pmkusum.mnre.gov.in या वेबसाईटला भेट देऊनही शेतकरी पीएम कुसुम योजनेची सविस्तर माहिती मिळवू शकतात.

टिप्पण्या

Popular Posts

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

  सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत. नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी  ई-श्रम कार्ड  (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभा...

Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा.

  Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा. March 25, 2023   by  Update 24 taas Free Electricity : हवामानामुळे या महिन्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे घरात जास्त वीज वापरली जात आहे. वीजेचा वापर जास्त असल्याने दरमहा हजारो रुपयांची वीजबिल भरावी लागते. दुसरीकडे उन्हाळ्यात लोडशेडिंगमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. येथे क्लिक करा  मोफत वीजेचा आनंद घेण्यासाठी येथे क्लिक करा    त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विलक्षण कल्पनाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात तुमच्या घराची वीज मोफत वापरू शकता आणि वीज विकूनही भरपूर कमाई करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.   येथे क्लिक करा  शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता एकाच अर्जावर मिळणार ट्रॅक्टर, शेततळे, विहिर, पॉलीहाऊस; असा करा अर्ज   या लेखात आम्ही तुम्हाला सोलर पॅनलपासून वीज निर्माण करण्याच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत परंतु या संपूर्ण प्रक्रियेत वापरलेले सोलर पॅनल्स आक...

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...