मुख्य सामग्रीवर वगळा

१५० कोटी कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प योजना निधी मंजूर (रफ्तारअंतर्गत)

 Posted on 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सन २०२१-२२ या आर्थिक वर्ष्यातील राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारअंतर्गत राज्य कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबवण्यासाठी दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हीही या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज केला असेल, तर हा शासन निर्णय GR तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. नक्की हा लेख संपूर्ण वाचा.

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प योजना २०२१ –

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये ऊर्जा वापर वाढवण्यासाठी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राज्यात राबवण्यात येत आहे. तसेच राज्यात विविध केंद्रपुरस्कृत योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये जसे की, राष्ट्रीय गळीत धान्य अभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, तेलबिया व तेलताड अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान याअंतर्गत सुद्धा कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो. शेतकऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणात कृषी यांत्रिकीकरण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. या बाबींचा विचार करुन राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार मधून कृषी यांत्रिकीकरण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

mahadbt portal farmer schemes 2021

दिनांक १० मे २०२१ रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या राज्यस्तरीय समितीने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाच्या १५० कोटी रकमेच्या प्रकल्पास मान्यता दिली होती. राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत १५० कोटींचा कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने खालील शासन निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प शासन निर्णय ८ सप्टेंबर २०२१ –

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत रुपये १५० कोटी निधीचा कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबवण्यास राज्य प्रशासनाने दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल.

maharashtra shasan portal
  • या राष्ट्रीय कृषी विकास योजना (रफ्तार) प्रकल्पाची अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज स्वीकारले जातात.
  • ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते.
  • लाभार्थी निवडीचे प्रत्यक्ष प्रक्रिया राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत निधी उपलब्धतेनुसार उपलब्ध निधीच्या मर्यादेत केली जाते.
  • प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या यंत्र अवजारांचे जिओ टॅगिंग केले जाते.
  • तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत मंजूर प्रकल्पांमधून केवळ कृषी यंत्र आणि अवजारांच्या खरेदी करताना अनुदान देण्यात येईल.
  • या निधीतून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान अनुज्ञेय असणार नाही याची नोंद घ्यावी.
  • तसेच या प्रकल्पाअंतर्गत मंजूर अनुदानाची रक्कम महाडीबीटी पोर्टल वरून PFMS यातून देण्यात येते, याची खात्री करण्याची जबाबदारी कृषी आयुक्त यांची असते.

वरील सर्व बाबी दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत. 

अश्याच आणखी नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत चला,आणि आपल्या दुसऱ्या शेतकरी मित्राला लाभ घेता यावा यासाठी नक्कीच शेअर करायला विसरू नका.

टिप्पण्या

Popular Posts

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...

रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card in Marathi

  How to Add Name in Ration Card in Marathi –   तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल. तर तुम्ही हे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी चा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करण्यासाठी काय करायचे सर्व माहिती दिली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता. अनुक्रमानिका     पहा   कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add New Family Member Name in Ration Card रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म pdf | Download Ration Card Form For Add New Family Member in Ration Card लग्नानंतर नवीन वधू चे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card After Marriage तुमच्या कुटुंबातील एखाद्या मुलाचे लग्न झाल्यानंतर. नवीन आलेल्या वधूचे नाव रे...

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

  सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत. नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी  ई-श्रम कार्ड  (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभा...