मुख्य सामग्रीवर वगळा

नाविन्यपूर्ण योजनांचे अर्ज सुरु | Navinyapurna Yojana



राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित आणि बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी मित्रांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत भांडवलाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला असून आतादेखील पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सुरु करण्यात आले आहेत. 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाइट खाली दिली आहे:

संकेतस्थळ: https://ah.mahabms.com 

या योजनेचे form भरण्याकरिता मोबाइल application देखील तयार करण्यात आलेले आहे.

अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनचे नाव : AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध),

अप्लिकेशन तुम्ही येथे डाउनलोड करू शकता Application Link

अर्ज करण्याचा कालावधी :०४/१२/२०२१ ते १८/१२/२०२१

अधिक माहिती साठी 

 टोल फ्री क्रमांक: १९६२ किंवा १८००-२३३-०४१८  वर संपर्क करू शकता

विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याचबरोबर जिल्हास्तरीय योजनांसाठी देखील सदर online प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये जर लाभारत्याने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय देखील केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता जास्त वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील त्यांच्या क्रमांकानुसार अंदाजे केव्हा मिळेल, हे कळू शकत असल्याने लाभार्थी हिस्सा भरणे अथवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

हे पण वाचा: PM Cares Yojana

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी चे गट वाटप करणे, १००० मांसाळ कुक्कुट पक्षी यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी Online पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री अथवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील वरी दिलेल्या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अँपवर देखील उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील याची सर्वानी नोंद घ्यावी. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सोपे करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि जास्तीत जास्त माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता शक्यतो स्वतःच्या मोबाईलचाच वापर करावा. 

अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या सद्य स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये असे सर्वाना आवाहन करन्यात येत आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

Popular Posts

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...

रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card in Marathi

  How to Add Name in Ration Card in Marathi –   तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल. तर तुम्ही हे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी चा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करण्यासाठी काय करायचे सर्व माहिती दिली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता. अनुक्रमानिका     पहा   कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add New Family Member Name in Ration Card रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म pdf | Download Ration Card Form For Add New Family Member in Ration Card लग्नानंतर नवीन वधू चे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card After Marriage तुमच्या कुटुंबातील एखाद्या मुलाचे लग्न झाल्यानंतर. नवीन आलेल्या वधूचे नाव रे...

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

  सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत. नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी  ई-श्रम कार्ड  (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभा...