मुख्य सामग्रीवर वगळा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही  योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आलेली आहे. यापूर्वी ही योजना “शेतकरी जनता अपघात विमा योजना” या नावाने राबवली जात होती.

शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातामुळे बऱ्याचदा शेतकऱ्याचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. अशा कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी ही योजना राबवली गेली होती , जेणेकरून अशा गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय आहे.

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात . उदाहरणार्थ अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जाऊ शकतो आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. 

२००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढी विमा रक्कम संरक्षित केली गेली होती परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली आणि योजनेला  ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’  असे नाव देण्यात आले.

राज्यातील एकूण सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्याना मिळणार आहे. यापुर्वी ज्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, आता यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.

हे पण वाचा: Rooftop Solar Yojana

1. महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 या वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (उदाहरणार्थ आई,वडिल, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन व्यक्ति पात्र असतील .      

2. नुकसान भर्पाइची रक्कम-              

अ.-अपघाती मृत्यू- रु.2 लाख.

ब.अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख                                    क- अपघातामुळे 1 डोळा किंवा 1 हात अथवा एक पाय निकामी झाल्यास – रु.1 लाख.                                             

3. विमा हप्ता देखील भरावा लागत नाही- सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम (प्रती शेतकरी रु.32.23 रु)  शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः विमा हप्ता भरण्याची गरज नाही.    

4. विमा पॉलिसी कालावधी- 10.12.2021 ते 9.12.2022

आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :

१)७/१२
२)६क
३)६ड(फेरफार)
४)एफ. आय. आर.
५)पंचनामा
६)पोष्ट मार्टेम रिपोर्ट
७)व्हिसेरा रिपोर्ट
८)दोषारोप
१०)दावा अर्ज
११)वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
१२)घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला
१४)तालुका कृषि अधिकार पत्र
१५)अकस्मात मृत्यूची खबर
१६)घटनास्थळ पंचनामा
१७)इंनक्वेस्ट पंचनामा
१८)वाहन चालविण्याचा वैध परवाना
१९)अपंगत्वाचा दाखला व फोटो
२०)औषधोपचारा चेकागदपत्र
२१)अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे

अर्ज कुठे करावातालुका कृषी अधिकारी कार्यालय. नमूना अरजसाठी येथे क्लिक करा अर्जाचा नमुना

विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या तारखेस तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकास तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे ग्राह्य धरले जाईल.

विमा प्रस्ताव हा सदर विहित कागदपत्रांसह योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या  दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीला बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कसलाही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत असे या Policy च्या धोरणांमद्धे नमूद केले गेले आहे.

टिप्पण्या

Popular Posts

रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card in Marathi

  How to Add Name in Ration Card in Marathi –   तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल. तर तुम्ही हे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी चा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करण्यासाठी काय करायचे सर्व माहिती दिली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता. अनुक्रमानिका     पहा   कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add New Family Member Name in Ration Card रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म pdf | Download Ration Card Form For Add New Family Member in Ration Card लग्नानंतर नवीन वधू चे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card After Marriage तुमच्या कुटुंबातील एखाद्या मुलाचे लग्न झाल्यानंतर. नवीन आलेल्या वधूचे नाव रे...

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...

एवढ्या शेतकऱ्यांना या वर्षी मिळणार किसान क्रेडिट कार्ड | Kisan Credit Card New Update in Marathi

  Kisan Credit Card information in marathi –   आतापर्यंत एक कोटी 94 लाख शेतकऱ्यांना. किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्ड न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी यावर्षी सुद्धा आनंदाची बातमी आहे. या रब्बी हंगामात उर्वरित शेतकऱ्यांना किसान के काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 66 लाख एवढ्या शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. तुम्हाला जर अजून मिळाले नसेल तर किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला सुद्धा मिळू शकते. अनुक्रमानिका     पहा   किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | What is Kisan Credit Card in Marathi किसान क्रेडिट कार्ड म्हणजे, शेतकऱ्यांना शेतमालासाठी ऐनवेळी पैसे लागतात. अशा वेळी शेतकऱ्यांकडे हक्काचे क्रेडिट असावे. याच्यासाठी सरकारने चालू केलेली किसान कार्य योजना आहे. मात्र या क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकरी केव्हाही आपल्या क्रेडिट कार्ड प्रमाणे पैसे काढू शकता. यावर्षी खूप साऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड बद्दलची अधिक तर माहिती खाली देण्यात आली आहे.    50 हजार कर्ज माफी 2 री यादी या दिवशी उत...