मुख्य सामग्रीवर वगळा

Borewell Water Sources | उन्हाळ्यात पडीक जमीनही बहरणार! ‘हे’ केमिकल टाकताच बंद बोअरलाही येणारं पाणी, तरुणाच्या संशोधनाचं गडकरींकडून कौतुक

 Borewell Water Sources | शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे पाणी. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणूनच पाण्यासाठी शेतकरी नदी, विहीर, तलाव, शेततळे किंवा बोअरवेलचा(borewell water) वापर करतात. बोरवेलचा हा शहरांमध्येही आणि गावांमध्ये शेतीसाठीही केला जातो. परंतु अनेकदा काही कारणास्तव बोअरवेलमधून पाणी (Agricultural Water source) येणे बंद होते. बोअरवेलमध्ये क्षार तसेच झाडांच्या मुळ्या, दगड, माती अडकते. म्हणून अनेकदा बोरवेल बंद पडते. आजच्या महागाईच्या युगात शेतकऱ्यांना या बोअरची तपासणी करण्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. म्हणूनच एका तरुणानं एक संशोधन (Agricultural Water Sources) केलं आहे. त्याची ही भन्नाट कामगिरी पाहता थेट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच या तरुणाची पाठ थोपटली आहे.



शेतकऱ्यांची चिंताच मिटली
आता बोअरवेल बंद पडले तर शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. कारण या तरुणाला शेतकऱ्यांची कायमची चिंता मिटवली आहे. तुमचं बंद पडलं तर चुटकीसरशी बोअरमध्ये केमिकल टाकून त्यातून पाणी निघू शकणार आहे. म्हणजेच या केमिकलमुळे बंद बोअरमधूनही (borewell water)पाणी येणार आहे. तरुणाचं हे संशोधन शेतकऱ्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. सोलापूरच्या व्यवसायाने खनिज अभियंता असलेल्या विशाल बगले या तरुणाने यावर उपाय शोधलेला आहे. त्याच्या या संशोधनाची दखल नितीन गडकरी यांनीही घेतली आहे.


काय आहे संशोधन?
विशालने शोधलेल्या तंत्रज्ञानाचे नाव आहे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान. या केमिकलच्या वापराने कोरड्या पडलेल्या बोअरमधील (borewell water)झरे मोकळे होऊन पाणी वाढण्यास मदत होते. हे केमिकल अल्प दरात उपलब्ध होणार आहे. यामुळे बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
खालावत चाललेल्या भूजल पातळीमळे शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात जर भर उन्हाळ्यात बोअरवेल बंद पडली तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे रहाते. जीवापाड वाढवलेले पीक वाळून जाण्याची भीती असते. मात्र या केमिकलच्या वापराने बोअरवेलमधील झरे मोकळे होतात. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यातही पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना सुटकेचा निःश्वास टाकता येईल.

गडकरींची कौतुकाची थाप
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संशोधनासाठी विशालचे कौतुक केले आहे. त्यांनी या संशोधनाची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिली. तसेच महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून हा प्रकल्प राबविण्यासाठी गडकरींनी सुचविले.

टिप्पण्या

Popular Posts

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

  सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत. नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी  ई-श्रम कार्ड  (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभा...

Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा.

  Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा. March 25, 2023   by  Update 24 taas Free Electricity : हवामानामुळे या महिन्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे घरात जास्त वीज वापरली जात आहे. वीजेचा वापर जास्त असल्याने दरमहा हजारो रुपयांची वीजबिल भरावी लागते. दुसरीकडे उन्हाळ्यात लोडशेडिंगमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. येथे क्लिक करा  मोफत वीजेचा आनंद घेण्यासाठी येथे क्लिक करा    त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विलक्षण कल्पनाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात तुमच्या घराची वीज मोफत वापरू शकता आणि वीज विकूनही भरपूर कमाई करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.   येथे क्लिक करा  शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता एकाच अर्जावर मिळणार ट्रॅक्टर, शेततळे, विहिर, पॉलीहाऊस; असा करा अर्ज   या लेखात आम्ही तुम्हाला सोलर पॅनलपासून वीज निर्माण करण्याच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत परंतु या संपूर्ण प्रक्रियेत वापरलेले सोलर पॅनल्स आक...

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...