मुख्य सामग्रीवर वगळा

Borewell Water Sources | उन्हाळ्यात पडीक जमीनही बहरणार! ‘हे’ केमिकल टाकताच बंद बोअरलाही येणारं पाणी, तरुणाच्या संशोधनाचं गडकरींकडून कौतुक

 Borewell Water Sources | शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे पाणी. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणूनच पाण्यासाठी शेतकरी नदी, विहीर, तलाव, शेततळे किंवा बोअरवेलचा(borewell water) वापर करतात. बोरवेलचा हा शहरांमध्येही आणि गावांमध्ये शेतीसाठीही केला जातो. परंतु अनेकदा काही कारणास्तव बोअरवेलमधून पाणी (Agricultural Water source) येणे बंद होते. बोअरवेलमध्ये क्षार तसेच झाडांच्या मुळ्या, दगड, माती अडकते. म्हणून अनेकदा बोरवेल बंद पडते. आजच्या महागाईच्या युगात शेतकऱ्यांना या बोअरची तपासणी करण्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. म्हणूनच एका तरुणानं एक संशोधन (Agricultural Water Sources) केलं आहे. त्याची ही भन्नाट कामगिरी पाहता थेट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच या तरुणाची पाठ थोपटली आहे.



शेतकऱ्यांची चिंताच मिटली
आता बोअरवेल बंद पडले तर शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. कारण या तरुणाला शेतकऱ्यांची कायमची चिंता मिटवली आहे. तुमचं बंद पडलं तर चुटकीसरशी बोअरमध्ये केमिकल टाकून त्यातून पाणी निघू शकणार आहे. म्हणजेच या केमिकलमुळे बंद बोअरमधूनही (borewell water)पाणी येणार आहे. तरुणाचं हे संशोधन शेतकऱ्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. सोलापूरच्या व्यवसायाने खनिज अभियंता असलेल्या विशाल बगले या तरुणाने यावर उपाय शोधलेला आहे. त्याच्या या संशोधनाची दखल नितीन गडकरी यांनीही घेतली आहे.


काय आहे संशोधन?
विशालने शोधलेल्या तंत्रज्ञानाचे नाव आहे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान. या केमिकलच्या वापराने कोरड्या पडलेल्या बोअरमधील (borewell water)झरे मोकळे होऊन पाणी वाढण्यास मदत होते. हे केमिकल अल्प दरात उपलब्ध होणार आहे. यामुळे बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
खालावत चाललेल्या भूजल पातळीमळे शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात जर भर उन्हाळ्यात बोअरवेल बंद पडली तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे रहाते. जीवापाड वाढवलेले पीक वाळून जाण्याची भीती असते. मात्र या केमिकलच्या वापराने बोअरवेलमधील झरे मोकळे होतात. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यातही पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना सुटकेचा निःश्वास टाकता येईल.

गडकरींची कौतुकाची थाप
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संशोधनासाठी विशालचे कौतुक केले आहे. त्यांनी या संशोधनाची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिली. तसेच महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून हा प्रकल्प राबविण्यासाठी गडकरींनी सुचविले.

टिप्पण्या

Popular Posts

रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card in Marathi

  How to Add Name in Ration Card in Marathi –   तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल. तर तुम्ही हे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी चा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करण्यासाठी काय करायचे सर्व माहिती दिली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता. अनुक्रमानिका     पहा   कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add New Family Member Name in Ration Card रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म pdf | Download Ration Card Form For Add New Family Member in Ration Card लग्नानंतर नवीन वधू चे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card After Marriage तुमच्या कुटुंबातील एखाद्या मुलाचे लग्न झाल्यानंतर. नवीन आलेल्या वधूचे नाव रे...

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...

एवढ्या शेतकऱ्यांना या वर्षी मिळणार किसान क्रेडिट कार्ड | Kisan Credit Card New Update in Marathi

  Kisan Credit Card information in marathi –   आतापर्यंत एक कोटी 94 लाख शेतकऱ्यांना. किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्ड न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी यावर्षी सुद्धा आनंदाची बातमी आहे. या रब्बी हंगामात उर्वरित शेतकऱ्यांना किसान के काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 66 लाख एवढ्या शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. तुम्हाला जर अजून मिळाले नसेल तर किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला सुद्धा मिळू शकते. अनुक्रमानिका     पहा   किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | What is Kisan Credit Card in Marathi किसान क्रेडिट कार्ड म्हणजे, शेतकऱ्यांना शेतमालासाठी ऐनवेळी पैसे लागतात. अशा वेळी शेतकऱ्यांकडे हक्काचे क्रेडिट असावे. याच्यासाठी सरकारने चालू केलेली किसान कार्य योजना आहे. मात्र या क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकरी केव्हाही आपल्या क्रेडिट कार्ड प्रमाणे पैसे काढू शकता. यावर्षी खूप साऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड बद्दलची अधिक तर माहिती खाली देण्यात आली आहे.    50 हजार कर्ज माफी 2 री यादी या दिवशी उत...